Thursday, 5 July 2012

काताळे  जेट्टी
             धोपावे -दाभोळ येथे असणाऱ्या फेरीबोट  प्रमाणेच तावासाळ च्या पुढे  काताळे येथे फेरी बोट सेवा सुरु करण्यात आली आहे. यामधून वाहने घेऊन पलीकडे सैतवडे गावात जाता येते . तिथून केवळ 15-16 किलोमीटर वर जयगड , गणपतीपुळे  , आणि रत्नागिरी अशा ठिकाणी जाता येते. किंवा बोटीने थेट जयगड बंदरात सुद्धा जाता येते. 

राई  - भातगाव पूल 
रत्नागिरी कडे जाताना  राई  - भातगाव पूल 

           गुहागर तालुक्यातील टोकाचे गाव म्हणजे भातगाव आणि रत्नागिरी तालुक्यातील राई या गावांना जोडणाऱ्या पुलामुळे गुहागर - रत्नागिरी हे अंतर 50किलोमीटर ने कमी झाले आहे. तव्सालच्या पुढे भातगाव मार्गे जाणारा रस्ता फारच रमणीय आहे. कधी दोन्ही बाजूला दात झाडीचे डोंगर तर कधी एका बाजूला खोल दरी जंगलातून जाणारा नागमोडी रस्ता कधी संपतो ते काळातही नाही . 
         काताळे जेट्टी  आणि राई भातगाव पुलामुळे थेट गणपतीपुळे , मालगुंड , जयगड , या स्थळांना भेट देऊन रत्नागिरीस जाणे फारच सोयीचे झाले आहे. या सोयी पर्यटकांसाठी निश्चितच स्वागतहर्या  आहेत.   

Thursday, 28 June 2012

चिपळूण मधील पर्यटन स्थळे :
श्री क्षेत्र परशुराम 
       मुंबई - गोवा महामार्गावर खेड नंतर  चिपळूणच्या अगोदर 10 किलोमिटर  डाव्या बाजूस रस्त्याने वर गेल्यावर आपण श्री क्षेत्र परशुराम इथे पोहोचतो . या रस्त्याला परशुराम घाटी असेही म्हणतात .
      विष्णूंचा  सहावा अवतार मानलेले भगवान परशुराम हे जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचे सुपुत्र . त्यांचे मुळ  नाव भार्गवराम . परंतु परशु या शास्त्राने त्यांनी शत्रूंचा नाश केला म्हणून त्यांना सर्व परशुराम म्हणून लागले. त्यांनी जिंकलेली सर्व भूमी कश्यप ऋषींना दान केल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी समुद्र मागे हटवून जी भूमी निर्माण केली तेच आजचे "कोकण ". त्यानंतर श्री परशुराम महेंद्र पर्वतावर स्थायिक झाले आज त्याच जागी परशुराम मंदिर उभे आहे . मंदिराच्या सभोवताली  दगडी तट  असून आत येण्यासाठी प्रमुख आणि दुसर्या बाजूला लहान दरवाजे आहेत. परशुराम मंदिरात मध्यभागी परशुरामाची , डावीकडे कामाची आणि उजवीकडे काळाची  मूर्ती आहे.  

सवतसडा 


परशुराम घाटिनंतर सपाटीला लागण्यापूर्वी डाव्या हाताला एक सुंदर धबधबा ऐईन पावसाळ्यात बघायला मिळतो . कड्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी , खालून वाहणारा  खळखळता ओढा  आणि आजूबाजूची हिरवाई यामुळे इथे थांबणे अपरीहार्य ठरते. सवतीमत्सरातून दोन्ही सवतीनचा या कड्यावरून खाली पडून  अंत  झाला . म्हणून यास "सवतसडा" असे वेगळेच नाव पडले  असावे.   

डेरवण शिवसृष्टी 


चिपळूण पासून 20 किलोमिटर  अंतरावर वालावलकर  ट्रस्ट मार्फ़त छत्रपति शिवाजी महाराजांच्या जिवनातील स्फूर्तिदायी प्रसंगावर आधारित शिवसृष्टि उभारली आहे. सिमेंट मधेय घडवलेल्या मुर्त्यांद्वारे मंडपाच्या भिंतीवर शिवजन्म , आग्र्याहून सुटका , अफजलखानाचा वध , शायीस्तेखानाचे पलायन अशा अनेक प्रसंगांचे देखावे उभे केले आहेत. महाराष्ट्राचा चैतन्यदायी इतिहास नव्या पिढीला ज्ञात करून देण्यात शिवसृष्टी चा हेतू सध्या होतो. 


श्री विन्ध्यवासिनी देवी 


नंद आणि यशोदेची मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव देवकीच्या कोठडीत पोहोचली तिला कंवसाने ठार मारण्यासाठी उचलले तेव्हा ती त्याच्या हातून निसटली आणि विन्ध्य पर्वतावर जावून राहिली तीच  ही विन्ध्यवासिनी.
देवीची मूर्ती 800-1000 वर्ष जुनी असून मूर्तीला   8 हात आहेत   आणि मूर्ती महिषासुरमर्दिनी रुपात आहे.
असे हे चिपळूण शहरही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.  

Thursday, 14 June 2012

श्री वेळणेश्वर   मंदिर - गुहागर  
श्री वेळणेश्वर 
           वेळणेश्वर या समुद्र काठच्या गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागर पर्यटन स्थळा मधेय  वेळणेश्वर गावचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तीव्र उतारांचा वळनावळनांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो.  वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सुमारे  1200 वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे.  वेळणेश्वर  मंदिराचा इतिहास  म्हणजेच या गावाचा इतिहास आहे. 
श्री वेळणेश्वर मंदिर  
           सभोवताली नारळ - पोफळीच्या बागा , सुरक्षित  आणि स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर  वेगळेपण जाणवते. वेला  म्हणजे समुद्र किनारा , त्या तीरावर असणारा देव तो  वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून  वेळणेश्वर . येथील  गावकऱ्यांच्या मते 12 व्या शतकात इथे छोटे मंदिर होते त्यावेळी त्यास " वेळोबा " म्हणत. 
              मंदिर आवर खूपच मोठे आहे. त्यामाधेय 9-10 मित्र उंचीची दीपमाळ  आहे. घुमटाकार  शिखराचा सभामंडप , बाहेर पितळी  ओटा , त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे  आणि त्यावर पाच फन्यांचा  नाग आहे. गाभाऱ्यात  अडीच - तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवट ठेवून पोशाख  घालतात शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर  कालीमाता , महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंच धातूच्या तर विठ्ठल रखुमाई ची पाषाण  मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागुनच श्री काळ भैरव , श्री  गणपती , श्री लक्ष्मि नारायण अशी मंदिरे आहेत . स्थानिक  लोक या काळ भैरवाला कौल  लावताना पहायची संधी मिळाल्यास ती जरूर बघावी. 
 वेळणेश्वर समुद्र 
          वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याचा विशेष उल्लेख करावा लागेल , स्वच्छ आणि सुरक्षित अशा समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे त्याला " मेरुमंडल "   म्हणतात. 
             इथे  येणाऱ्या  पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स वगैरे  आहेत. तसेच  वेळणेश्वर  भक्त निवसातही उत्तम सोय  होऊ शकते. अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच !  

Thursday, 7 June 2012

हेदवी - श्री दशभुज गणपती 
          गुहागर पासून २५ किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे. किल्लेवजा तटबंदीने वेढलेले थोड्या उंचीवरील गणेश मंदिर. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि थेट प्रवेशद्वारापर्यंत रस्ताही आहे. दगडी तटबंदी , आजूबाजूचा परिसर , फुलबाग आणि पाश्वभूमीवर दिसणारी मंदिराची दगडी वास्तू यामुळे  प्रथम दर्शनीच पर्यटक प्रेमात पडतो. इतर पर्यटन स्थळांप्रमाणेच हेदवी गणेशाची पण काहीशी कथा सांगितली जाते. 
मंदिर 
     पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे गणेशभक्त राहत होते. त्यांची पुण्याला पेशव्यांशी भेट झाली असता त्यांना वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना त्या काळी मंदिर बांधण्यासाठी १ लाख रुपये दिले . त्या पैशातून केळकर स्वामिनी हे मंदिर उभारले. गणपतीची मूर्ती काश्मीर मधील पाषाणापासून बनवलेली आहे. दहा हातांच्या या मूर्तीच्या मांडीवर सिद्धलक्ष्मि विराजमान आहेत. उजव्या वरच्या हातात चक्र , दुसऱ्या हातात त्रिशूळ , तिसऱ्या हातात धनुष्य , चौथ्या हातात गदा आणि पाचव्या आशीर्वादाच्या हातात महाळूंग फळ आहे. डाव्या हाताच्या वरच्या हातात कमाल , दुसऱ्या हातात पाश , तिसऱ्या हातात नीलकमळ , चौथ्या हातात रदन (दात ) , आणि पाचव्या हातात धान्याची लोंबी आहे. सोंडेत अमृतकुंभ म्हणजे कलश आहे. मूर्तीचे कोरीवकाम उत्कृष्ट असून गळ्यात अनेक प्रकारच्या माळा आहेत. सिंव्हासनावर उंदीरही कोरलेला आहे. सभामंडपात गाभाऱ्याच्या प्रवेशभिंतीवर जय विजय या द्वारपालांच्या चतुर्भुज मूर्ती आहेत आणि बाहेरील बाजूला पिसारा फुलवलेल्या मोराच्या प्रतिमा आहेत.  मंदिर आवारातच दीपमाळही आहे 

Thursday, 31 May 2012

बामणघळ  - हेदवी
                      हेदवीच्या समुद्र किनाऱ्यावर , सुरुच्या दाट सावलीत समुद्रावरचा भन्नाट वारा घेत निवांत बसने हा एक सुखद अनुभव आहे. या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चमत्काराचे एक रौद्र दर्शन घडते. समुद्राकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या बाजूला दिसणाऱ्या उमा - महेश्वराच्या मंदिराच्या बाजूने डोंगराच्या कडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी  भेग दिसते. येथे डोंगरावर वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी धडकून एक अरुंद घळ तयार झाली असून येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. या कपारीत पाणी घुसून जोरात वर उसळते. 
                       या ठिकाणी गावातील लोकांकडून एक कथा ऐकायला  मिळते , वेळ रात्रीची होती , कोणी एक ब्राह्मण या वाटेने चालला होता , या घळीची त्यास माहिती नव्हती . त्याचा पाय घसरला आणि या घळीने त्यास पोटात घेतले .तेव्हापासून बहुतेक याला  "बामणघळ " असे नाव पडले.  

बुधल सडा 


अर्धवर्तुळाकार उथळ  पुळण  
            बुधल हे सर्वसामान्य पर्यटकांना फारसे  माहिती नसणारे ठिकाण . गुहागर पासून साधारण २० किलोमीटर अंतरावर. बुधालाची अर्धा कि.मी. लांबीची अर्धवर्तुळाकार उथळ  पुळण हेच या गावाचे प्रमुख आकर्षण आहे. 
प्रवाळयुक्त दगड  (Basalt rocks)
             येथील निळे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ आहे कि पाण्याखालची दोन - तीन फुटावरची जमीन दिसते. बाजूला दोन्हींकडे उंच टेकड्या आणि मध्ये छोटीशी पुळण आहे. टेकडीच्या बाजूला  खडकांवर लाटांचे सतत थैमान सुरु असते. कपारीत जावून घुसळणारे पाणी , २-३ मी. उंच उडणारे शुभ्र कारंजे न त्याच्याशी होणारे काळ्या दगडांची टक्कर , अत्यंत सुंदर दृश्य बघावयास मिळते. परंतु हे दृश्य दुरूनच पाहणे योग्य , कारण हा प्रवाळयुक्त दगड आहे.    
   

Thursday, 17 May 2012

गोपळ गड  - गुहागर 


गोपाळगड 
               गुहागर गावापासून  अंजनवेल गावातून  थेंट  किल्ल्यापर्यंत गाडी जाते. तसेच हौशी पर्यटक  अंजनवेल     गावातून  किल्ला चढूनही जाता येतें. काहींच्या मते , आंग्रे काळात या किल्ल्याचा  किल्लेदार गोपाळराव यांच्या नावा वरून  गोपाळगड  हे  नाव पडले असावे . किल्ल्याच्या भक्कम तटबंदित  एकूण बारा बुरुजे आहेत . पूर्वेला आणि पश्चिमेकडे  दोन दरवाजे आहेत . दरवाज्याच्या दोन्ही बाजूस  पहारेकर्यांच्या  देवड्या आहेत. जसजसे किल्ल्याच्या आत प्रवेश करू तसे एक एक  अवशेष दिसु  लागतात. किल्लेदाराच्या वाड्याचे , कोठीचे  अवशेष आणि तीन विहिरी आणि अनेक छोटी मोठी जोती नजरेस  पडतात .  तटबंदिवर गवताचे रान नसेल तर संपूर्ण किल्ल्याभोवती फिरता येते. फिरतांना समुद्र , दाभोळची खाडी , वासिष्टी नदी , एनरोन प्रकल्प , पायथ्याशी अंजनवेल , धोपावे , नवानगर   असे मोठे नयनरम्य दृश्य दिसतें . 


उरफाटा गणपती 


               गुहागर  येथील कोळी समाजातील लोकांना समुद्रात एक गणेशमूर्ती सापडली होती. सर्वांनी मिळून या गणेशाची प्रतिष्ठापना केली. एकदा समुद्राला भरती येऊन गुहागर बुडण्याची वेळ आली असताना ग्रामस्थांनी या गणपतीची आराधना केली. त्या वेळी पूर्वाभिमुख गणेशाने आपले तोंड पश्चिमेकडे करून समुद्राची दिशा बदलल्याची दंतकथा आहे. त्यामुळे या गणपतीचे नाव  ‘उरफाटा गणपती’ असे पडले. या गणपतीची प्रतिष्ठापना सुमारे तीनशे वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येते. हा गणपती खरे कुळाचा आहे. खरे घराण्यातील सदस्य हे मातीच्या मूर्तीची पूजा भाद्रपद गणेश चतुर्थीला न करता घरातील पितळेची मूर्ती घेऊन किंवा नर्मदेचा गणपती म्हणून लाल दगडाची पूजा करतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. ही मूर्ती पांढरी शुभ्र आहे. या मूर्तीची उंची जवळपास अडीच फूट असून चतुर्भुज संबोधली जाणारी ही गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे

      

Thursday, 10 May 2012

                                                                      श्री व्याडेश्वर मंदिर 
                  गुहागर गावात गेल्यावर गावाच्या बाजार पेठेतच श्री व्याडेश्वर चे मंदिर आहे . गुहागर मधेय पूर्वी खूप    वाड्या होत्या . त्या वाद्यांचा देव म्हणून व्याडेश्वर किंवा वाडा  म्हणजे  तबेंल्याजवळ हे लिंग सापडले म्हणून व्याडेश्वर नाव पडले अशा कथा गुहागरवासी सांगतात . संपूर्ण दगडी बांधकाम केलेल्या या मंदिराला दगडी तत्बंदीही आहे. या तटबंदीतून आत प्रवेश केल्यावर एका बाजूला गरीद आणि दुसर्या बाजूला मारुती अशा मूर्ती आहेत. 
            मंदिर आवारात तीन दीपमाळा  आहेत. सभामंडपात तीन - साडेतीन  फुटाचा पाषाणाचा नंदी  आहे . गाभाराच्या मध्यावर 1.5 मी लांब आणि 1 मी उंच अशी काळ्या पाषाणातील शिवपिंडी असून त्यावर सुरेख कोरीवकाम असलेल्या तांब्याच्या नागराजाची प्रतिमा आहे. पिंडीवर त्रिशूळ  ठेवलेला आहे. 
            इतर अनेक मंदिरांप्रमाणे या मंदिरालाही सुरस पुराणकथा आहेत . कोण्याकळी इथल्या शिवलिंगांचे तीन कडपे उडाले , एक असगोलिचा वाळकेशवेर (वाळूकेश्वेर ) , दुसरा अदूरचा टाल्केश्वेर आणि तिसरा अनजन्वेलचा उडालेला उदालेश्वेर . गुहागरचा प्रसिद्ध होळीचा सन हा मंदिर परिसरात साजरा होतो . गुहागरच्या निसर्गसौन्दर्यबरोबरच व्यादेश्वेराचेही महात्म्य आहे.